HW News Marathi
राजकारण

…तर पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद दिसणार नाही !

नवी दिल्ली | “इम्रान खान यांचे जर खरंच पंतप्रधान मोदींवर प्रेम असेल तर पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद दिसणार नाही. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना थारा दिला जाणार नाही. पाकिस्तानमधून दहशतवाद संपूर्णपणे नष्ट होईल”, असे विधान केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे कायमच पंतप्रधान मोदींच्या बाजूने भूमिका घेत असतात. त्यामुळे विरोधकांकडून अनेक शंका उपस्थित केल्या जातात. याच पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह बोलत होते.

“काँग्रेसने आमच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला कमकुवत करत आहे. आपल्या जवानांच्या शौर्याची, धैर्याची प्रशंसा करणे चुकीचे आहे का ? आम्ही केवळ निवडणुकांच्या वेळीच नव्हे तर कायमच आपल्या जवानांच्या शौर्याचे पराक्रमाचे कौतुक करतो. भाजपने कधीच कोणाच्या देशभक्तीवर संशय घेतला नाही”, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

“दहशतवादाला जात, धर्म, प्रांत असे काहीही नसते. दहशतवाद हा दहशतवादच असतो. आम्ही जागतिक पातळीवर सर्व देशांना एकत्र करून दहशतवादाच्या समस्येचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहोत. इम्रान खान यांचे जर खरंच पंतप्रधान मोदींवर प्रेम असेल तर पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद दिसणार नाही. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना थारा दिला जाणार नाही”, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बोलावले तरी प्रीती भोजनाला जाणार नाही !

News Desk

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | तीनपैकी एका आरोपी डॉक्टरला अटक

News Desk

हा कसा निवडून येतो तेच मी बघतो !

News Desk