HW News Marathi
राजकारण

… मग कर्ज कशासाठी !

मुंबई | सरकारच्या तिजोरीत पैसे आहेत म्हणूनच सरकार २० हजार कोटीच्या पुरवण्या मागण्यांवर खर्च करायला तयार आहे मग सरकार ५०० कोटी रुपये एखादया संस्थानाकडे मागते म्हणजे हे हास्यास्पद असून सरकारची आर्थिक विश्वार्हता किती कमी झाली आहे हे यावरुन दिसून येते अशी जोरदार टिका करतानाच मग कर्ज कशासाठी असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला

शिर्डी संस्थानाकडून राज्यसरकारने ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. यावर मिडिया प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना आमदार जयंतराव पाटील यांनी सरकारच्या या धोरणावर सडकून टिका केली. एखादया संस्थानाकडून बिनव्याजी पैसे घेण्याची वेळ जर सरकारवर आली असेल तर सरकारची आर्थिक अवस्था अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे याबाबत सरकारने खुलासा करावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली.

सरकारने सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी विविध भागामध्ये केलेला खर्चच कमी आहे. आम्ही सत्तेत असताना हिच मंडळी सिंचनाचा बॅकलॉग दूर करण्याचा आग्रह करायची. आम्ही ११ हजार कोटींपर्यंत निधी सिंचनावर खर्च केला आहे. हे सरकार मात्र ४-५ हजार कोटींवर निधी खर्च करायला तयार नाही. त्यामुळे सिंचनाचे सर्व प्रकल्प ठप्प आहेत असेही आमदार जयंतराव पाटील म्हणाले.

शिर्डीच्या संस्थानाकडून सरकारनं कर्ज घेतलं. या कर्जाची गरज का, तर निळवंडी धरणाचं काम पुढे नेण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सरकारच्या लिक्विडिटीचा क्रंच आलेला आहे. सरकार अडचणीत आहे. सरकारनं सर्व मार्ग अनुसरल्यानंतर शेवटी कुणीच कर्ज देत नसल्याचं लक्षात आल्यावर आपल्या ताब्यातील आणि जिथे संचालक मंडळ नेमलेले आहे त्याठिकाणच्या शिर्डी संस्थानाकडून ५०० कोटीचे कर्ज घेण्याचा मार्ग अनुसरला आहे त्यामुळे राज्य सरकारची पत कमी झाली आहे हे लक्षात येते असा गंभीर आरोप प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कर्नाटक राज्यातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे”, छगन भुजबळांचा टोला

Aprna

सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या सत्तांतरावर शिंदे गटाचा युक्तीवाद पूर्ण; उद्या पुन्हा होणार सुनावणी

Aprna

RamMandir : असा असेल उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा

News Desk