HW News Marathi
राजकारण

अब्दुल सत्तारांचा पक्षातील काही लोकांवर गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई | “माझ्या पक्षातील आणि विरोधी पक्षातील काही हितचिंतक आहे. माझ्याविरोधात कट कारस्थान रचले जात आहे”, असा गंभीर आरोप राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला आहे. अब्दुल सत्तारांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यामुळे शिंदे गटात सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. राज्यात शिंदे सरकार आल्यापासून सत्तार हे टीईटी घोटाळा, कृषीमहोत्सव आणि गायरान जमिनी आदी मुद्यावरून भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी लावू धरली होती. यानंतर सत्तारांचा एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत स्वत:च्या पक्षातील नेत्यांवर आरोप केले आहे. अब्दुल सत्तारांच्या आरोपावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले,  “माझ्यावर झालेल्या सर्व आरोपाचे खुलासे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केला आहे. जेव्हा मी राज्याचा राज्यमंत्री झाल्यानंतर माझ्यावर आरोप करण्यात आले असून हा मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यात माझ्या पक्षातील माझे काही हितचिंतक असू शकतात. तर विरोधी पक्षातील माझे अनेक हितचिंतक आहेत. अल्पसंखाक व्यक्ती कृषिमंत्री पदावर बसल्याचे काही लोकांना पहावत नाही. यामुळे माझ्याविरोधात कट कारस्थान रचले जात आहे.”

आमच्या पक्षाच्या बैठकीमधील बातम्या बाहेर येत असून आमची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली होती. या बैठकीत काय झाले यांच्या बातम्या बाहेर आल्या. महत्वाचे म्हणजे ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या देखील बाहेर आल्याचे अब्दुल सत्तारांनी सांगितले.  अब्दुल सत्तार पुढे म्हणाले, “यामुळे कुणीतरी आपल्या खासगीतील गोष्टी बाहेर पुरवित असून या सर्व गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या आहेत. यासंदर्भातील चौकशी करण्याची मागणी केली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवस्मारक हे पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात !

News Desk

आंध्रप्रदेशमध्ये सीबीआयला बंदी

News Desk

राज ठाकरे यांनी कट-पेस्ट करुन लोकांची दिशाभूल करु नये !

News Desk