HW News Marathi
राजकारण

…तर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरजच पडली नसती !

नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोपाळ मतदारसंघाचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी लक्ष्य केले आहे. “जर जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजरला शाप दिला असता तर आपल्याला सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज पडली नसती”, असा टोला दिग्विजय सिंह यांनी लगावला आहे. ते प्रचारसभेत बोलत होते. यावेळी दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींवर देखील टीका केली आहे.

“दहशतवादी नरकात गेले तरीही आम्ही त्यांना शोधून काढू असे म्हणणारे पंतप्रधान पुलवामा, पठाणकोट आणि उरी हल्ल्यानंतर कुठे गेले ? असा सवाल देखील दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, “मला हेमंत करकरे यांनी खोट्या प्रकरणात फसविले. तेव्हा मी हेमंत करकरे यांना शाप दिला होता कि त्यांचा सर्वनाश होईल. ते अखेर दहशतवाद्यांच्या हातूनच मारले गेले”, असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांनी साध्वी प्रज्ञाला हा टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मायावतींचा जेडीएसला काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचा सल्ला

News Desk

बजरंग दलाचे सर्मथक, कन्हैया कुमारमध्ये हाणामारी

swarit

राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna