HW News Marathi
राजकारण

“भारत जोडो यात्रेचा उद्देश ‘मन की बात’ करण्याचा नाही तर…”, राहुल गांधींचा भाजपला टोला

मुंबई | “भाजपच्या दहशत, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात ही भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेचा उद्देश मन की बात करण्याचा गरज नाही.  तर जनतेचा आवाज ऐकण्याचा घेण्यासाठी आहे”, असा टोला म्हणत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शेगावच्या सभेतून भाजपला लगावला आहे. सध्या राज्यात राहुल गांधींनी वीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. यावेळी राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) शेगावच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल होते. परंतु, या सभेत राहुल गांधींनी सावरकरांवर बोलणे टाळले. तर भाजपवर राहुल गांधींनी जोरदार हल्लाबोल केला.

राहुल गांधी म्हणाले, “भारत जोडो यात्रेची गरज काय, असा सवाल विरोधक विचारत आहेत. आज देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपने द्वेष, भीती, दहशत आणि हिंसेचा प्रचार केला आहे. भाजपच्या दहशत, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात ही भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेचा उद्देश मन की बात करण्याची गरज नाही, तर जनतेचा आवाज ऐकण्याचा आणि त्यांचे दुःख समजून घेणे हा यात्रेचा उद्देश आहे.”

राहुल गांधींनी सभेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात बोलताना म्हणाले, “जगाला दिशा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे. येथे विदर्भातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. शेतकऱ्यांना विम्याचे पैसे भरून सुद्धा शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर सत्तत अन्याय होत आहेत. आणि शेतकऱ्यांच्या मालाला देखील भाव मिळत नाही, परंतु, देशातील काही उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले जाते.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

News Desk

विधानसभा अध्यक्षानंतर आता विरोधी पक्षनेत्याची निवड होण्याची शक्यता

News Desk

जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींचा राजीनामा

News Desk