HW News Marathi
राजकारण

“ही सर्व मंडळी ED मुळेच आली ती म्हणजे…,” अखेर फडणवीसांनी सभागृहात केले मान्य

मुंबई | “ही मंडळी ईडीमुळेच आली आहे. फक्त ही ईडी म्हणजे ‘E’ म्हणजे,  Eknath आणि ‘D’ म्हणजे, Devendra आहे,” असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारना आज (4 जुलै) बहुमत चाचणीत विजयी मिळाला आहे. विधानसभेत अधिवेशनाच्या बहुतम चाचणीपूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या आणखी एक आमदार शिंदे गटात सामील झाला आहे. यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. यानंतर फडणवीसांनी विधानसभेत अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.

फडणवीस म्हणाले, “मला असे वाटते की, आपण सगळे राजकीय विरोधक आहेत. आपण शत्रू नाही आहोत. मगाशी आता काही लोक ईडी ईडी ओरडत होती. खरच आहे, ही मंडळी ईडीमुळेच आली आहे. फक्त ही ईडी म्हणजे ‘E’ म्हणजे,  Eknath आणि ‘D’ म्हणजे, Devendra आहे.” शिंदे-भाजप सरकार 164 मतांनी आज  बहुमत चाचणीची विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडी सरकार 99 मतांनी बहुमत चाचणीत फेल झाले आहेत.  विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत देखील काल (3 जुलै) 164 मतांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा विजयी झाला आहे.

बुहमत चाचणीच्या वेळी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांचा क्रमांक येताच सभागृहात ईडी ईडी अशा घोषणाबाजी करण्यात आल्या. त्यावेळी सरकारई म्हणाले, “मी तुम्हाला अर्ध्या तासांनी तुम्हाला उत्तर देईन,” असा धमकी वजा इशारा त्यांनी दिला.

संबंधित बातम्या
शिंदे सरकारने बहुमत चाचणीची अग्निपरीक्षा केली पास; तर महाविकास आघाडी फेल
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी आता निवडणुक लढणार नाही। चंद्रकांत पाटील

News Desk

होय मी बंडखोर !

News Desk

अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर; ‘धनुष्यबाण’ कोणाला मिळणार?

Aprna