HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न | आव्हाड

मुंबई | नालासोपाऱ्यातील भांडारआळी परिसरात सनातन संस्थेचे वैभव राऊत यांच्या घरावर आणि दुकानावर एटीएसच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा छापा टाकला. वैभव राऊत यांच्या घरातून यावेळी आठ देशी बॉंब हस्तगत करण्यात आले. सरकारी वकीलांकडून न्यायालयात याप्रकरणी मोठा गौप्यस्फोट करण्यात आला असून आरोपींकडून ८ नाही तर २० बॉब जप्त करण्यात आल्याची माहिती वकीलांनी दिली आहे. तसेच ५० बॉंब बनू शकतील इतके साहित्यही जप्त करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊतच्या घरी सापडलेली ही स्फोटके मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी होती, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाडांनी या बाबत त्यांच्या अधिकृत ट्वीटर हॅंडल वरुन ट्वीट केले आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने वैभव राऊत यांच्या घरी धाड टाकली होती. त्या धाडीमध्ये त्यांच्या घरी स्फोटके सापडली होती.

या प्रकरणी वैभव राऊत व त्यांच्या दोन साथीदारांकडून ATS ने जप्त केलेले जवळ-जवळ ८ क्रूड बॉम्ब आणि ५० बॉम्ब बनवण्याची सामुग्री ही मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठीच होती, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : आम्ही लोकांसाठी एकत्र आलो, आम्हाला गोरगरीबांसाठी सत्ता हवी !

News Desk

…तर पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही !

Gauri Tilekar

विधानसभेसाठी भाजप-शिवसेनेचा ५०-५० फॉर्मुला

News Desk