HW News Marathi
राजकारण

मराठा आरक्षणाच्या मर्यादेत वाढ केल्याशिवाय हे आरक्षण टिकणार नाही !

मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षणाची मर्यादा वाढविल्याशिवाय हे आरक्षण टिकू शकणार नाही, भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यावर उपाय म्हणून केंद्राने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मर्यादेत वाढ करून ते ७०% टक्के करावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सुचविले आहे. केंद्र आणि राज्यातील आरक्षण वेगळे ठेवावे, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

न्या. गायकवाडांचा अहवाल सकारात्मक असला तरी यापूर्वीचे सराफ आणि बापट आयोग मराठा आरक्षणाविरोधात होते. त्यामुळे आता मराठा समाजाचे आरक्षण हे पूर्णपणे राज्य सरकारच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ‘आरक्षण केवळ ५० टक्क्यांपर्यंतच देण्यात यावे, असे भारतीय संविधानात कुठेही म्हटलेले नाही. मग मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण का ?’, हा प्रश्न देखील प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींनी राफेल, नोटबंदीसह नीरव मोदींवर माझ्याशी खुली चर्चा करावी !

News Desk

“भाजपने ही निवडणूक लढवू नये”, पत्र लिहून राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केले आवाहन

Aprna

अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी! –  नाना पटोले

Aprna