मुंबई | काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रा दाखल झालेली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रे सुरू आहे. गेल्या दोन महिन्यापासून भारत जोडो यात्रा सुरू असून ही यात्रा सोमवारी (7 नोव्हेंबर) महाराष्ट्रात दाखल झाली आहे. भारत जोडो यात्रा ही तेलंगणामार्गे नांदेडच्या देगलूरमध्ये दाखल झाली. यातवेळी राहुल गांधी यांनी हातात मशाल घेत महाराष्ट्रात प्रवेश केला. राहुल गांधीसोबतत हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांचे महाराष्ट्रात यात्रेला प्रारंभ केला आहे.
महाराष्ट्रात ही यात्रा 14 दिवस असणार आहे. या दारम्यान राहुल गांधी अनेक कार्यक्रम, सभा आणि चौकातील सभांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात आल्यानंतर राहुल गांधींनी नगर परिषदेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या यात्रेत राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत यात्रा सुरू आहे. ही यात्रा भारत जोडोचा उद्देश हा देश जोडण्याचा आहे. काँग्रेसने भारत तोडोच्या विरोधात भारत जोडो यात्रा आहे. या 14 दिवसातील यात्रेत राज्यातील जनतेचे दु:ख समजून घेण्यासाठी आलो आहे, असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.
राहुल गांधी आजचा असा आहे कार्यक्रम
- सकाळी 8.30 वाजता नांदेडमधील गुरुद्वारापासून यात्रेला सुरुवात होणार
- सकाळी 9.30 वाजता अटकाळी गावाजवळ विश्रांती घेणार आहे.
- दुपारी 4 वाजता पदयात्रेला खतगाव फाट्यापासून सुरुवात होईल
- संध्याकाळी 7 वाजता संध्याकाळची विश्रांती घेणार आहे.