HW News Marathi
राजकारण

जे राम मंदिराला विरोध करतील त्यांचे देशामध्ये फिरणे कठीण होईल | संजय राऊत

लखनऊ | अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात राजकारण चांगलेच तापले आहे.’आम्ही १७ मिनिटांमध्ये बाबरी मशीद तोडली मग कायदा बनवायला किती वेळ लागतो ?’, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राष्ट्रपती भावनपासून उत्तर प्रदेशपर्यंत भाजपचे सरकार आहे. राज्यसभेत असे अनेक खासदार आहेत जे राम मंदिराच्या बाजूने उभे राहतील आणि जे विरोध करतील त्यांचे देशामध्ये फिरणे देखील कठीण होईल, असा धमकी वजा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील २५ नोव्हेंबरला अयोध्येत दाखल होणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असतानाच संजय राऊत यांच्या या विधानामुळे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलिसांकडून दोषारोप पत्र दाखल

Aprna

मला जिवे मारण्याचा कट । तेज प्रताप यादव

News Desk

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची बैठक संपली; बंडखोराबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Aprna