HW News Marathi
राजकारण

आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी आंदोलकांनी अहिंसा आणि शांततेचा मार्ग अवलंबावा

मुंबई | अनुसूचित जातीजमाती आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आणि धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा आणि सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. आरक्षणाचा लढा आंदोलकांनी संयम बाळगून अहिंसा आणि शांततेच्या सनदशीर मार्गानेच लढला पाहिजे.आरक्षणाच्या मागणीसाठी होणाऱ्या आत्महत्या रोखल्या पाहिजेत असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

मराठा समाजाने सुरु केलेले ठोक मोर्चा आंदोलन थांबविले हा योग्य निर्णय घेतल्याबद्दल मराठा समाजाचे अभिनंदन रामदास आठवले यांनी केले आहे. एक मराठा लाख मराठा ही घोषणा देऊन मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे अत्यंत शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध काढले त्याबद्दल संपूर्ण देशाने मराठा समाजाचे कौतुक केले होते. असाच शांततेच्या मार्गानेच मराठा समाजाने आणि धनगर समाजाने आरक्षणाचा लढा लढला पाहिजे असे रामदास आठवले यांनी मत व्यक्त केले आहे.

मराठा आरक्षणासाठी सरकार वेगाने प्रयत्न करीत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठीची संसदीय प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे त्यासाठीचा अवधी सरकारला दिला पाहिजे. मराठा आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी आंदोलकांनी संयम बाळगून अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने लढले पाहिजे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकात अखेर भाजपचा झेंडा

News Desk

मला आजही पंतप्रधान मोदींची जात माहित नाही !

News Desk

बदनामीकारक वक्तव्य केल्याने अण्णा हजारेंची नवाब मलिक यांना नोटीस

News Desk