HW News Marathi
राजकारण

पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज (९ एप्रिल) थंडावणार आहे. पहिल्या टप्प्यात देशातील २० राज्याच्या ९१ जागांवर निवडणुकासाठी मतदान होणार आहे. देशात ७ टप्प्यात मतदान होणार असून २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांच्या प्रचारतोफा आज संध्याकाळी सहा वाजतेपर्यंत थंडावणार आहेत. त्यापूर्वीच युती आणि आघाडीच्या उमेदवारांकडून अंतिम टप्प्याच्या सभा, रॅली आणि भेटीचा जोर वाढलेले चित्र सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे.

नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, हंसराज अहिर, नाना पटोले यासारख्या दिग्गज नेत्यांसह ११६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहेत. चार जागांवर भाजप आणि काँग्रेसचा थेट आमना-सामना होणार आहे. तर दोन जागांवर काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांसोमर आले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघर लोकसभा पोटनिवडणुक निकाल अपडेट

News Desk

धर्मनिरपेक्ष भारतासाठी माझा लढा कायम राहणार !

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ कृतीचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक

Aprna