HW News Marathi
राजकारण

बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी माढ्याला वळवा !

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आता राज्य सरकारने मोठा धक्का दिला. राज्य सरकारने बारामतीला जाणारे नीरा डाव्या कालव्याचे ६० टक्के पाणी हे माढ्याला देण्याचे थेट आदेश काढले आहेत. निरा डावा कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश यापूर्वीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे पाणी बंद करण्याची मागणी केली होती. दरम्यान, खासदारपदी येताच नाईक-निंबाळकर यांनी बारामतीचे पाणी अडविण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. आता राज्य सरकारने देखील तसे थेट आदेश दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

बारामतीला जाणारे नीरा डाव्या कालव्याचे नियमबाह्य पाणी बंद करण्याच्या गिरीश महाजन यांच्या या आदेशामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पाणी हा प्रत्येकाचा अधिकार आहे. “बारामतीचेच काय कोणाचेही पाणी रोखणे चूकीचे आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. तर “नीरेच्या पाण्यावरून राजकारण करू नका”, असेही शरद पवार म्हणाले होते. तर “रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बारामतीच्या पाण्यावरून राजकारण पेटविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु नव्याचे नऊच दिवस असतात”, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकारण्यांची भुताटकी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कशी आटोक्यात आणाणार ?

News Desk

मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा भाजपचा डाव आहे !

News Desk

#LokSabhaElections2019 : आता भाजपचे सर्वच नेते झाले ‘चौकीदार’, भाजपचे नवे प्रचारतंत्र

News Desk