HW News Marathi
राजकारण

उध्दव, राज व आंबेडकर यांची निवडणुकीत ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरची मागणी

मुंबई | देशात भाजपाविरोधी वातावरण असतानाही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेले यश हे एकप्रकारचे गूढच म्हणायला हवे, अशी प्रतिक्रिया शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मुंबईत मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी म्हटले की, विरोधी पक्ष यावरून मतदान यंत्रात (ईव्हीएम) काळबेरे असल्याचा आरोपही करतात. त्यामुळे भाजपाने या प्रकरणाचा एकदा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा. भाजपाला स्वत:वर विश्वास असेल तर त्यांनी ईव्हीएम मशिनऐवजी मतपत्रिकांद्वारे निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान उद्धव यांनी दिले.

 

तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ‘कर्नाटकातील विजय हा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो’असे ट्विट राज ठाकरे यांनी केले.

भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार येदियुरप्पा यांनी मी १८ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ असे वक्तव्य केले होत. येदियुरप्पा यांनी एका पत्रकार परिषदेत बोलत होते. या वक्तव्यावरुन भारिप महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सवाल उपस्थित केला की, ‘निवडणुकीचे निकाल लागण्या आधीच यांना कसे कळाले की, भाजपचा विजयी होणार आहेत. तसेच ईव्हीएम मशीन मतदान झाल्यानंतर दोन दिवस गोडाउनमध्ये का ठेवता ?, मतदान झाल्यानंतर १-२ तासात निकाल का नाही सांगत?, असे अनेक प्रश्न आंबेडकर यांनी मराठी पत्रकार संघात धनगर समाजाच्या राज्यव्यापी मेळव्याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त शेअर बाजारासाठी नकारात्मक

News Desk

मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती

Manasi Devkar

आपल्या विधानानंतर अवघ्या २४ तासातच राहुल गांधींनी दिले हे स्पष्टीकरण

Gauri Tilekar