HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरे यांनी आता पराभवाची सवय करुन घ्यावी !

औरंगाबाद | “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता पराभवाची सवय करुन घ्यावी”, असे बोचरे विधान औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे एमआयएमचे विजयी उमेदवार इम्तियाज जलील यांनी केला आहे. औरंगाबाद मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे, सतत ४ वेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांना त्यांच्या ३१ वर्षांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. असे असताना आता जलील यांनी पुन्हा एक वक्तव्य करून शिवसेनेला टोला लगावला आहे.

“येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेनेबरोबर माझा सामना होईल. तेव्हा मी मराठवाड्यात एमआयएमचे ७ आमदार निवडून आणेन”, असा दावा देखील जलील यांनी केला आहे. “पराभवानंतर आता शिवसेना पुन्हा हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा काढत आहे. मात्र, हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांच्याकडे कोणता दुसरा मुद्दाच राहिलेला नाही”, असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. ते हैदराबाद येथे बोलत होते.

औरंगाबाद मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे इथे झालेला हा प्रभाव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. “मी निवडणुकीपूर्वीच आर्ट अटॅक येऊन मेलो का नाही”, अशी उद्विग्न प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी काहीच दिवसांपूर्वी दिली होती. तर, “लोकसभेत झालेला चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा माझा पराभव आहे”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून त्यांना केंद्रातील सरकार कमकुवत हवे आहे !

News Desk

न्यायालयाच्या चपलेने राफेल आरोपाचा विंचू मारण्याचा प्रयत्न होतोय !

News Desk

भाजपकडून लोकांचा कौल बदलण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात !

News Desk