Site icon HW News Marathi

“…एवढा खोटारडा माणूस मी आयुष्यात कधीही पाहिला नाही”, नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

मुंबई | “उद्धव ठाकरे यांच्याएवढा खोटारडा माणूस मी आयुष्यात कधीही पाहिला नाही”, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे. राणेंनी आज (22 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या काल (21 सप्टेंबर) मुंबईतील गटमेळाव्यावरून निशाणा साधला.

नारायण राणे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हे आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत लढत राहिले. बाळासाहेबांनी मुख्यमंत्री पदाचे विचार मातीत घातले.” उद्धव ठाकरेंच्या कालच्या मेळाव्यातील भाषणावर बोलताना राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे म्हणतात मुंबईमध्ये सध्या गिधाडे फिरत आहेत. अरे केंद्रीय मंत्री आहेत. ते देश सांभाळात आहेत. तुम्ही त्यांना असे कसे काय म्हणू शकतात. गुधाडे म्हणणे चुकीचे आहे, असे बोलल्यामुळे तुम्हाला जेलमध्ये जाल. तुम्ही लबाड लांडगे आहात. उद्धव ठाकरे हे देशाच्या मोठ्या नेत्यांना गिधाडे  तुम्ही लबाड लांडगा आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासारखा खोटारडा माणून मी आयुष्यात कधीही पाहिले नाही. भाजप-शिवसेनेची युती असताना मला मंत्रीपद मिळू नये, म्हणून उद्धव ठाकरेंनी अमित शहांना फोन करत होते. आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे हे तीन तास मंत्रालयात बसले होते.”

“उद्धव ठाकरेंनी संपूर्ण आयुष्यात कुणाला कानफाटी तरी मारला का ?, त्यांनी पक्ष वाढीसाठी काही केले का?, आयत्या बिळावर ते नागोबा आहेत. ते काही न करता ते सरळ मुख्यमंत्री पदी झाले. शिवसेना वाढायला, घडायला आणि सत्तेवर याला शिवसैनिकांचा त्याग आहेत,” अशी टीका राणेंनी केली.

 

 

 

Exit mobile version