HW News Marathi
राजकारण

आम्ही जाती-पातीचे राजकारण करत नाही | मोदी

बिलासपूर | “आम्ही जाती-पातीचे राजकारण करत नाही, आम्ही फक्त विकास कामांवर भर दिला आहे. त्यामुळे आमच्या विरोधकांना आमच्या बदल बोलायला मुद्दे नाहीत,” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला. छत्तीसगडमधल्या मतदानाच्या दुस-या टप्प्यादरम्यान मोदींनी रॅली काढली होती. यावेळी मोदी म्हटले की, गांधी परिवार पैशांची हेराफेरी करून जामिनावर बाहेर फिरत असे बोलून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच ते पुढे असे देखील म्हणाले की, बस्तरमध्ये मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर पडून मतदान करत आहे.

नोटाबंदीमुळे जमा झालेले पैसे तुमच्यावर खर्च करण्यासाठी आमचे सरकार पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. या देशात शक्ती आणि संकल्पाची कमी नाही. काँग्रेसचे माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते, दिल्लीतून एक रुपया निघाल्यास जनतेपर्यंत १५ पैसेच पोहोचतात. हा कोणता पंजा आहे. जो ८५ पैसे मधल्या मध्ये गायब करतो. हा पंजा १ रुपयाचे १५ पैसे कसे करतो. नोटाबंदीनंतर हा पैसा बाहेर आला आहे. बऱ्याचदा विरोधकांकडून स्वच्छ भारत सारख्या योजनांची खिल्ली उडवली जाते.

आमचा हेतू मुलाचे शिक्षण, तरुणाच्या नोकऱ्या, शेतकऱ्यांचा मालाला भाव, वयोवृद्धांना मुबलक प्रमाणात औषधे पुरवण्याचा आहे. छत्तीसगडमध्ये वारंवार भाजपाला आशीर्वाद मिळत आला आहे. जनता जनार्दन आणि कार्यकर्त्यांच्या मजबूत संघटनामुळेच हे शक्य आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्येनंतर ठाकरेंची पंढरीची वारी

News Desk

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप ‘या’ मतदारसंघात लक्ष केंद्रीत करणार

Aprna

#Elections2019 : जाणून घ्या…जालना मतदारसंघाबाबत

News Desk