HW News Marathi
राजकारण

आम्ही लोकांच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याचे काम करतो !

बीड | “जेव्हा एक महिला राजकारणात येते तेव्हा जशी काही लोकांना बाटलीत बंद करण्याची गरज असते तशीच काहींना बाटलीतून बाहेर काढायची देखील गरज असते. मला आता ते चांगलंच लक्षात आलं आहे”, असे सूचक वक्तव्य महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. “जे जे जिल्ह्याच्या विकासात आडवे येतील, त्यांना बाटलीत बंद करुन अरबी समुद्रात फेकून दिले जाईल”, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. पंकजा मुंडे बुधवारी (६ जानेवारी) बीडमध्ये बोलत होत्या.

“पूर्वी रस्ते फक्त कागदावर व्हायचे, केवळ स्वतःचे बगलबच्चे पोसण्याचे व्हायचे मात्र आता सर्व टेंडर ऑनलाईन निघतात. आम्ही लोकांच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याचे काम करतो”, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. ४०० कोटी रुपयांच्या विविध विकास योजनांच्या शुभारंभ आणि भूमिपूजन कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड नगरपालिकेसाठी २ टप्प्यात ४९५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

“गेल्या १० वर्षात बीड जिल्ह्याचा विकास करायचा सोडून केवळ राजकारण करण्याच काम राष्ट्रवादीने केले. बीड जिल्ह्याने डझनभर आमदार देऊनही त्यांनी जिल्ह्याला रुपयाचा निधी दिला नाही. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तब्बल ४९५ कोटींचा निधी दिला आहे”, असे म्हणजे पंकजा मुंडे यांनी यावेळी राष्ट्रवादीवर निशाणा साधला तर मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस

News Desk

आज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही! – शरद पवार

Aprna

‘धनुष्यबाणा’चे चिन्हा गोठवा; सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्या वकीलाने केली मागणी

Aprna