HW News Marathi
राजकारण

“आदित्य ठाकरेंचे शिवसेनेसाठी योगदान काय?,” रामदास कदमांचा सवाल

मुंबई | “तुमच्या आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) शिवसेनेसाठी (Shiv Sena) योगदान काय?,” असा थेट सवाल शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. रामदास कदम यांनी टीव्ही 9 मराठी दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंनी दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या मुलाखतीवर बोलताना म्हणाले, “उंदराला मांजर साक्ष अशीच ही मुलाखत होती. बाळासाहेबांसाठी शिवसेना ही आई होती. तर त्यांच्या विचारांसोबत कोणी गद्दारी केली ते सुद्धा सांगा. नवीन शिवसैनिक हे तुमच्या भावनात्मक गोष्टीत अडकतील. परंतु, जुन्या शिवसैनिकांनी अनुभव घेतला आहे. अनेक शिवसैनिकांचा मृत्यू, देशोधडीला लागले, संसार उद्ध्वस्त झाले. यानंतर शिवसेना उभी राहिली आहे. यात तुमच्या आदित्य ठाकरेचे शिवसेनेसाठी योगदान काय? ते आमदार आणि खासदारांना देखील पाहत नाही. मी प्लास्टिक बंदी केली आणि आपणच प्लास्टिक बंदी केली असे सभागृहात सांगितले होते.”

मराठा समाजातील लोकांना पुढे जाऊन द्यायचे नाही

रामदास कदम म्हणाले, “उद्धव ठाकरेंना मराठा समाजातील लोकांना पुढे जाऊन द्यायचे नाही. मराठा समाजातील नेत्यांना त्यांना संपवायचे आहे,” असा मला संशय असल्याचा आरोप त्यांनी केला. jरामदास कदम म्हणाले, “यात  नारायण राणे, रामदास कदम, एकनाथ शिंदे कोणीही असो मराठा नेतृत्वाला पुढे जाऊन द्यायचे नाही, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे का?, असा प्रश्न मला पडला आहे.”

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सभागृहाच्या कामकाजात भाजपचा अडथळा

News Desk

मुख्यमंत्री पर्रीकर करणार लवकरच कामकाजाला सुरुवात !

Gauri Tilekar

हे सत्य स्वीकारण्याची हिंमत दाखवाल का ?, अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk