HW News Marathi
राजकारण

संयुक्त पत्रकार परिषदेत मी आणि उध्दव ठाकरे जे बोललो तेच अंतिम !

मुंबई । “अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळण्याच्या अटीवरच शिवसेना-भाजपची युती झाली असून भाजपने ही अट अमान्य केल्यास युती तोडू”, असे वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांनी काहीच दिवसांपूर्वी केले होते. मात्र “कोणकोणते मुद्दे, अटी विचारात घेऊन भाजप-शिवसेनेची युती झाली याबाबत मी आणि उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषदेत जे बोललो तेच अंतिम समजा”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (२३ फेब्रुवारी) स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे त्या संयुक्त पत्रकार परिषदेत केवळ जागावाटपाविषयी माहिती देण्यात आली होती. मात्र, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. “त्या पत्रकार परिषदेत आम्ही जे बोललो तेच अंतिम समजा”, या मुख्यमंत्र्यांच्या विधान म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतले जाणार नसल्याचे संकेत आहेत का ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ज्यांची लायकी नाही अशा राजकारणांच्या हाती…”, सुबोध भावेंनी राज्यपालांना चपराक लगावली

Aprna

#LokSabhaElections2019 : सुजय विखे पाटील यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

News Desk

आताचे अन् विधानसभेनंतरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

News Desk