HW News Marathi
राजकारण

मी नुसते राजीव गांधींचे नाव घेतले अन् त्यांच्या पोटात जोरदार दुखू लागले !

नवी दिल्ली | “मी नुसते राजीव गांधींचे नाव घेतले तर त्यांच्या पोटात जोरदार दुखू लागले. त्यांनी नुसते रडणेच बाकी ठेवले आहे. मात्र, ते यावरून जेवढे रडतील तेवढेच जास्त जुने सत्य आजच्या पिढीसमोर येईल. जर राहुल गांधींमध्ये आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर निवडणुकीतील उर्वरित पुढचे दोन्ही टप्पे राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाच्या मुद्द्यावर लढवून दाखवावेत”, असे खुले आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला दिले आहे. मोदी हे झारखंड येथील प्रचारसभेत बोलत होते.

“मी नुसता बोफोर्स घोटाळ्याचा उल्लेख केला तर काँग्रेसमध्ये वादळ आले. मी नुसते राजीव गांधींचे नाव घेतले आणि त्यांच्या जोरदार पोटात दुखू लागले. त्यांनी नुसते रडणेच बाकी ठेवले आहे. मात्र, ते यावरून जेवढे रडतील तेवढेच याबाबतचे सत्य आजच्या पिढीला समजेल”, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. मी राहुल गांधींना आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांना खुले आव्हान देतो कि जर त्यांच्यात ताकद असेल तर देशातील लोकसभेचे उर्वरित पुढचे दोन्ही टप्पे त्यांनी राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाच्या मुद्दा घेऊन लढवावेत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘२०२२ पर्यंत रस्ते विकासाचे चित्र पूर्णपणे बदलणार’

Gauri Tilekar

देशात भाजपसोबत मुकाबला करण्यासाठी कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही! – जे. पी. नड्डा

Aprna

धर्मनिरपेक्ष भारतासाठी माझा लढा कायम राहणार !

News Desk