HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्र आपली कर्मभूमी म्हणविणारे बाॅलीवूड कलाकार आता आहेत कुठे ?

मुंबई | “महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून सांगणारे ते बाॅलीवूड कलाकार या संकटकाळात कुठे आहेत ?”, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. राज्यातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्तरांतून, प्रत्येक क्षेत्रातून मदतीचा ओघ सुरु आहे. प्रत्येक जण पूरग्रस्तांना यथाशक्ती मदत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील सांगली, कोल्हापूर, सातारकरांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत करत आहेत. या पार्श्वभूमीवर आपली कर्मभूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख करून देणारे बॉलिवूड कलाकार आज महाराष्ट्र इतक्या मोठे समस्येचा सामना करत असताना कुठे आहेत ?, असा खोचक सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे.

 

“लानत है उनपर, जिनके पास दानत नही है”, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेची अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बॉलिवूड कलाकारांवर टीका केली आहे. “ज्या प्रेक्षकांच्या जीवावर आपल्या तुंबड्या भरता तेच प्रेक्षक जेव्हा दुःखात आहेत तेव्हा त्यांना सावरण्यासाठी पुढे का आला नाही ?”, असा सवाल अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे. “समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी बघून सगळेच भारावलेत, पण… महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून सांगणारे ते बाॅलीवूड कलाकार या संकटकाळात कुठे आहेत ? असो, आम्ही आमच्या मातीतल्या मायेच्या माणसांसाठी सदैव झटत राहू”, असे ट्विट मनसेकडून करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबादेवीमध्ये मनसे पदाधिकाऱ्याची महिलेला केलेल्या मारहाणीनंतर पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया

Aprna

राम मंदिर बांधून कुणाचे पोट भरणार असेल तर आमचा नक्कीच पाठिंबा असेल !

News Desk

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन जाधव यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा

swarit