HW News Marathi
राजकारण

“अदानींच्या कंपनीमधील 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कोणाची?”, राहुल गांधींचा सवाल

मुंबई | “अदानी यांच्या शेल कंपनीमधील 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कोणाची आहे. तो पैसा कोणाचा आहे? “, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) केला आहे. या मानहानी प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द लोकसभा सचिवालयाने करण्यासंदर्भात आदेश जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज (25 मार्च) पत्रकार परिषद घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती गौतम अदानी आणि भाजपवर हल्लाबोल केला.

 

राहुल गांधी म्हणाले, “अदानी यांची शेल कंपनी आहे. या कंपनीला 20 हजार कोटी रुपयांची गुंतवले गेले आहेत. ते पैसे अदानीचे नाहीत, तर ते पैसे दुसऱ्याचे आहेत. आणि संसदेत अदानीवरून प्रश्न केले. हे 20 हजार कोटी रुपये कोणाचे आहेत. संसदेत मी मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांबद्दल संसदेत सविस्तर बोललो. मोदी आणि अदानी यांचे नाते जुने आहे. यावर मी प्रश्न विचारले आहेत. मी प्रश्न विचारणे बंद करणार नाही. माझा तो इतिहास नाही. मी देशाच्या लोकशाहीसाठी लढतोय, मी घाबरत नाही. अदानीच्या कंपनीत 20 हजार कोटी कोणी गुंतवले. माझी खासदारकी रद्द करून मला गप्प करू शकत नाही. अदानीच्या कंपनीत कोणी गुंतवणूक केली हा प्रश्न मला विचारून दिला जात नाही.”

 

गांधी कधी माफी मागत नाहीत

“देशातील संस्थांचे रक्षण करणे आणि गरीब लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोवणे आणि पंतप्रधानांशी असेलल्या नात्यांचा गैरफायदा घेणाऱ्या अदानीसारख्या लोकांबद्दल बोलणे हे माझे कामच आहे. मोदी सरकारच्या धमक्यांना आणि आरोपांना मी घाबरत नाही. माझे नाव गांधी आहे. मी कोणाची माफी मागणार नाही. गांधी कधी माफी मागत नाहीत. माफी मागायला मी काय सावरकर नाही,” असे राहुल गांधी म्हणाले.

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! राहुल गांधींची खासदारकी रद्द; काय आहे प्रकरण?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईवर दावा सांगणे खपवून घेणार नाही! – देवेंद्र फडणवीस

Aprna

बहुमत चाचणीपूर्वीच ठाकरेंना धक्का! संतोष बांगर शिंदे गटात सामील

Aprna

“जिथे जिथे मंत्री येतील, तिथे तिथे त्यांना विचारा ‘देता की जाता ?”, आदित्य ठाकरेंचे आवाहन

Aprna