HW News Marathi
राजकारण

मुस्लिम समाजावर सरकार अन्याय का करत आहे ?

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळाले. धनगर समाजाबाबत सकारात्मक आहात मग मुस्लिम समाजावर सरकार अन्याय का करत आहे, असा सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केला.

राज्यातील मुस्लिम समाज घटकामध्ये शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे. कालच सर्वानुमते मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विधेयक मंजुर करण्यात आले आहे. तर धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक आहे. मात्र मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार का बोलत नाही.

राज्य सरकारने मुस्लिम समाजावर अन्याय केला आहे. उच्च न्यायालयाने ५ टक्के शैक्षणिक आरक्षणाचे मान्य नाही केले. परंतु स्थगितीही दिली नाही. जेव्हा स्थगिती मिळत नाही त्यावेळी तो निर्णय सकारात्मक असतो. त्यामुळे तो निर्णय झाला तर तो चांगला संदेश महाराष्ट्रात जावू शकतो. त्यामुळे सरकारने तशी भूमिका घ्यावी अशी आग्रही मागणीही अजित पवार यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मीच नव्हे तर माझ्यासोबत काँग्रेसचे ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील

News Desk

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आजी, माजी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

News Desk

बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही

News Desk