HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्राबाहेर सभा घेणार नाही !

मुंबई | फक्त महाराष्ट्र नाही तर देशभरात सध्या ज्यांच्या भाषणांची चर्चा आहे. स्वतःचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीला उभा नसताना सभांच्या माध्यमातून मोदी आणि शहा या जोडीविरुद्ध खुलेपणाने प्रचार करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एच.डब्ल्यू.न्यूज नेटवर्कला मुलाखत दिली आहे .यामध्ये राज ठाकरे यांनी मुख्यतः आजवर जो मुद्दा प्रखरपणे आणि ठामपणे मांडला आहे तो म्हणजे आपल्या राज्याची संस्कृती, मराठी भाषा ही बाहेरून येणाऱ्या लोकांनी जपली पाहिजे. महाराष्ट्रातले रोजगार हे सर्वात पहिल्यांदा मराठी मुलांसाठी हवेत, असे राज यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे यावेळी प्रस्ताव आला तरीही आपण महाराष्ट्राबाहेर प्रचार करणार नसल्याचे राज यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवारांशी केवळ माझेच नव्हे तर सर्वांचेच चांगले संबंध आहेत. पंतप्रधान मोदी म्हणतात कि ते शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आले. मग त्यांना कोणी प्रश्न का विचारत नाही ?, असाही सवाल राज यांनी यावेळी विचारला. नितीन गडकरी पंतप्रधान होतील का ? या प्रश्नावर त्यांची सत्ता आली तर ना ? त्यांना होऊ दिले तर ना ? असे प्रतिप्रश्न राज यांनी केले आहेत. “देशातील सर्वात मोठा पक्ष भाजपसुद्धा असू शकतो तसेच काँग्रेससुद्धा असू शकतो”, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

भविष्यात शिवसेना आणि मनसे अर्थात उद्धव आणि राज यांना एकत्र पाहायला मिळेल का ? या प्रश्नावर नरेंद्र मोदींसारखा माणूस ५ वर्षात इतका बदलू शकतो तर काहीही शक्य आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी भविष्यात शिवसेना आणि मनसे एकत्र दिसणे शक्य असल्याचे संकेतच दिले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या बाजूने होतो परंतु त्यानंतर मोदी सरकारचे बदलेले रंग सगळ्यांनी पहिले आहेत, असेही राज यावेळी म्हणाले.

२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी एक वेगळीच व्यक्ती दिसते आणि पंतप्रधान झाल्यानंतर एक वेगळीच व्यक्ती दिसते ? हे कसे ?, असाही सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे. जीएसटी , नोटबंदी या गोष्टी भाजपच्या जाहीरनाम्यात होत्या का ? असे प्रश्न सुद्धा उपस्थित केले. इतकेच नव्हे तर “नोटबंदी हा स्वतंत्र भारतातला सर्वात मोठा घोटाळा. याबाबत जेव्हा चौकशी होईल तेव्हा अनेक गोष्टी बाहेर येतील आणि लोकांना कळेल कि नेमका घोटाळा काय आहे”, असे देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले. निवडणुकांसाठी सैनिकांच्या कर्तृत्वाचे केलेले भांडवल किती योग्य आहे ?

एच.डब्ल्यूशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमके काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांनी घेतलेली त्यांची ही संपूर्ण मुलाखत अवश्य पहा…!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे विधानभवनाबाहेर आंदोलन

News Desk

भारतात इतकी ताकद आहे की आपण शब्‍दकोशातील शब्‍दांचे अर्थ देखील बदलले !

News Desk

अनिल देशमुखांनी भाजपवर केलेल्या ‘त्या’ आरोपाचे गिरीश महाजनांनी केले खंडन

Aprna