HW News Marathi
राजकारण

#Vidhansabha2019 | वडिलांसाठी ऐरोली मतदारसंघातून संदीप नाईक माघार घेणार ?

मुंबई | आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून सोमवारी (१ ऑक्टोबर) पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. मात्र, आता उमेदवारीवरून नाराजी नाट्याला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. भाजपच्या या पहिल्या यादीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संदीप नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून बेलापूर मतदारसंघातून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे बेलापूरचे माजी आमदार गणेश नाईक नाराज असल्याचे समजत आहे. म्हणूनच, गणेश नाईक यांनी आपल्या समर्थकांसोबत बैठक देखील घेतली. त्यानंतर, आता आपल्या वडिलांसाठी संदीप नाईक ऐरोली मतदारसंघातून माघार घेऊन, गणेश नाईक ऐरोली मतदारसंघातून लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले गणेश नाईक हे राष्ट्रवादीचे बेलापूर मतदारसंघाचे माजी आमदार होते. त्यामुळे, त्यांच्या भाजप प्रवेशाला भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा तीव्र विरोध होता. कारण, गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाने मंदा म्हात्रे यांनी डावलले जाण्याची शक्यता होती. मात्र, भाजपने मंदा म्हात्रे यांना नाराज न करता उमेदवारी दिली. परंतु, गणेश नाईक या मतदारसंघातून इच्छुक असल्याने ते मात्र नाराज झाले. त्यामुळे, संदीप नाईक यांनी आपल्या वडिलांसाठी ऐरोली मतदारसंघातून माघार घेऊन गणेश नाईक यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप-शिवसेनेची युती झाली तर स्वाभिमान पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात स्वतंत्र लढेल !

News Desk

पंतप्रधान मोदी दुपारपर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता

News Desk

मी माझ्या संपूर्ण प्रचार मोहिमेत सीपीएमविरोधात एकही शब्द बोलणार नाही !

News Desk