HW News Marathi
क्राइम महाराष्ट्र मुंबई राजकारण

संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

मुंबई – पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patrachal Scam) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं (ED) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडी पूर्ण प्रयत्न करणार आहे. राऊत यांच्याविरोधात पुरावे असूनही सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) त्यांना जामीन दिल्याचं सांगत ईडीनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

आता उच्च न्यायालय नेमका काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक थेट बेकायदेशीर ठरवत पीएमएलए कोर्टानं (PMLA Court) ईडीला धक्का दिला होता. यामुळे ईडीच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला होता आणि संजय राऊत १०० दिवसांनी तुरुंगाबाहेर आले.

संजय राऊत यांच्या जामीन प्रकरणावर सुनावणी घेताना विशेष सत्र न्यायालयाने (Special Session Court) ईडीला सुनावलं होतं. पत्रा चाळ प्रकरणी दोन्ही आरोपींना बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आली आहे. दिवाणी खटले हे मनी लॉन्डरिंग (Money Laundering) किंवा आर्थिक गुन्हे (Financial Crime) अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून त्यांना अटक करून अशा परिस्थितीत आणणं हे न्यायालय मान्य करू शकत नाही, असं कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मल्ल्याने कर्जाची रक्कम गुंतवली बोगस कंपन्यांत

News Desk

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उध्दव ठाकरेंचे राज्यपालांना प्रत्युत्तर

News Desk

राज्यात सत्त स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल | सुधीर मुनगंटीवार

News Desk