HW News Marathi
राजकारण

माझा जो छळ केला त्याची माफी मागणार का ?

नवी दिल्ली | “माझा जो छळ केला त्याची माफी मागणार का ?”, अस सवाल बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भोपाळ मतदारसंघातील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी उपस्थित केला आहे. साध्वी प्रज्ञाच्या शहीद हेमंत करकरे यांच्याविषयीच्या वादग्रस्त विधानामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी (१९ एप्रिल) रात्री उशिरा साध्वी प्रज्ञा यांनी आपले करकरेंविषयीचे विधान मागे घेतले. मात्र, पुन्हा सकाळी पत्रकार परिषद घेऊन माझा छळ केल्याची माफी मागणार का ? असा सवाल करत नव्या वादाला आमंत्रण दिले आहे.

“माझ्या विधानाचा फायदा देशाच्या शत्रूंना होईल. म्हणूनच मी माझे विधान मागे घेत आहे. ते वक्तव्य माझे वैयक्तिक असून त्यासाठी मी माफी मागते “, असे म्हणत साध्वी प्रज्ञाने शुक्रवारी रात्री उशिरा आपले विधान मागे घेतले. “हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने अडकवले. मी त्यांना म्हटलेच होते की, तुमचा सर्वनाश होईल. शेवटी ते दहशतवाद्यांकडून मारले गेलेच. त्यांचा मृत्यू त्यांच्या स्वत:च्या कर्मानेच झाला,” असे संतापजनक वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते.

“साध्वी प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयाक्तिक मत आहे. त्यांच्या या वक्तव्याशी पक्षाचा काहीही संबंध नाही”, असे म्हणत भाजपने या प्रकरणात आपले हात वर केले आहेत. भाजपने एक पत्रक काढून आपली याबाबतची भूमिका स्पष्ट केली. प्रज्ञा सिंह ठाकूरच्या या वक्तव्यानंतर भाजपला सर्वच स्तरातील लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीवरून वाद पेटलेला असताना पंतप्रधान मोदींनी मात्र त्यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

RamMandir : असा असेल उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा

News Desk

२०१९च्या निवडणुकीत ‘कर्नाटकी कशिद्या’ची छाप दिसेल काय?

News Desk

पुलवामा हल्ला हा मोदी-इम्रान खान यांचा कट, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप

News Desk