HW News Marathi
राजकारण

ईव्हीएम हटवल्याशिवाय विधानसभा होऊ देणार नाही !

मुंबई | “ईव्हीएम हटवल्याशिवाय राज्यात विधानसभा निवडणूक होऊ देणार नाही”, अशी आक्रमक भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. “लोकसभेदरम्यान ईव्हीएमवर विरोधकांकडून इतके आरोप होऊनही सत्ताधा-यांनी ही बाब दुर्लक्षित करून ईव्हीएमद्वारेच मतदान प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, विधानसभेत असे होऊ देणार नाही. ईव्हीएम हटवल्याशिवाय राज्यात विधानसभा निवडणूक होऊ देणार नाही”, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

“यंदाच्या लोकसभेच्या निकालानंतर आमचा ईव्हीएमवरून विश्वास उडाला आहे. आम्हाला लोकांचा पाठिंबा असूनही आमचा लोकसभेत पराभव होतो, हे आम्हाला पटत नाही. ईव्हीएमध्ये घोळ करूनच भाजप विजयी झाला आहे”, असा आरोप अशोक सोनोने यांनी केला आहे. ‘ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव’ असा नारा देत आम्ही राज्यभर ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार असल्याचे देखील अशोक सोनोने यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने माणसांचे इमान विकत घेण्याचा पॅटर्न राबवला !

News Desk

जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपची खासियत !

News Desk

राज ठाकरे साधणार उत्तर भारतीयांशी संवाद

News Desk