HW News Marathi
क्रीडा

उल्हासनगरात महाविद्यालयाचा फुड फेस्टिवल झाला कॅशलेस

गौतम वाघ

उल्हासनगर :: उल्हासनगरातील एस.एस.टी. महाविद्यालयाच्या फुड फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यानी पेटीएम व भिम अ‍ॅपच्या साहाय्याने विक्री व्यवहार करीत कॅशलेस अर्थव्यस्थेचा प्रचार केला. तसेच स्वच्छतेसाठी कचराकुंडया ठेवत स्वच्छ भारत अभियानातही भाग घेत देशाच्या विकासात आगळे वेगळे योगदान दिले.

देशभरात नोटबंदीनंतर कॅशलेस अर्थव्यवस्था करण्यासाठी शासनाने जोरदार मोहिमा सुरू केल्या आहेत. त्याला विविध स्तरातुन पाठिंबा मिळत आहे. असे असतानाच उल्हासनगर कॅम्प नं. ४ येथील एस.एस.टी. महाविद्यालयाने शुक्रवारी आयोजित केलेल्या फुड फेस्टीवलमध्ये कॅशलेस अर्थव्यवस्थेचा जोरदार प्रचार केला. या फेस्टिवलमध्ये ३६ स्टॉलधारकांपैकी बहुतांश स्टॉलवर विद्यार्थ्यानी पेटीएम आणि भीम अ‍ॅपची नोंदणी करीत कोड स्कॅन करण्यासाठी ठेवला होता.

महाविद्यालयातील जनसंवाद अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकणारे विद्यार्थी अक्षय बैसाणे, निखिल जाधव आणि प्रसाद पिसाल यानी पाणीपुरी आणि भेलचा स्टॉल लावला होता. या स्टॉलवर ठेवलेल्या पेटीएमच्या कोडबाबत अक्षय बैसाणेला विचारले असता त्यानी सांगितले की मी नोटबंदीच्या पुर्वीपासुन पेटीएमचा वापर करत आहे. पेटीएम व भिम अ‍ॅपचा वापर करून खरेदी विक्री व्यवहार कशाप्रकारे केले जातात याबाबत माझ्या विद्यार्थी मित्राना मार्गदर्शन आम्ही फुड फेस्टिवलच्या माध्यमातुन केले. याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य जे.सी.पुरस्वानी यानी सांगितले की सहा महिन्यांपासुन मोफत वायफाय सुविधा विद्यार्थ्याना उपलब्ध करून दिली आहे. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कॅशलेस अर्थव्यवस्थेचा प्रचार प्रत्येक भारतीयाने केली पाहिजे. आमच्या महाविद्यालयामार्फत देशाच्या विकासासाठी पुरेपुर योगदान देत आहोत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत-पाक क्रिकेट चाहत्यांचे अतुट नाते

News Desk

Asian Games 2018 | आशियाई स्पर्धेत भारताला नेमबाजीत कांस्य पदक

swarit

#IndiaVsPakistan : पावसाचे संकट टळले मात्र धाकधूक कायम

News Desk