HW News Marathi
क्रीडा

‘आशिया चषक २०१८’वर भारताने कोरले आपले नाव

मुंबई । ‘आशिया चषक २०१८’च्या अंतिम फेरीत अतुल्य अशी कामगिरी करत भारतीय क्रिकेट संघाने सातव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. कर्णधार रोहित शर्मा याच्या उत्कृष्ट नेतृत्वाखाली अत्यंत दमदार अशी कामगिरी करत भारताने ‘आशिया चषक २०१८’ पटकावले आहे. आणखी एक विशेष म्हणजे रोहित शर्मा हा आशिया चषक पटकावणारा तिसरा मुंबईकर कर्णधार ठरला आहे.

आशिया चषकामध्ये भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानच्या संघाला दोन वेळा पराभूत केले आहे. या चषकात अफगाणिस्तानसोबतची बरोबरी सोडता भारतीय संघ बाकी एकाही सामन्यात अपयशी ठरलेला नाही.

भारताने १९८४ साली सर्वप्रथम आशिया चषक पटकावला होता. त्यावेळी सुनील गावस्कर हे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. १९८४ साली आशिया चषकाचे जेतेपद पटकावले होते, तर श्रीलंकेने उपविजेतेपद पटकावले होते. त्यानंतर दुसऱ्या वेळेस कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी भारताला आशिया चषकाचे जेतेपद पटकावून दिले होते.आतापर्यंत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सात वेळा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर हे दोघेही भारतीय क्रिकेट संघाचे मुंबईकर कर्णधार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

swarit

भारत-पाक क्रिकेट चाहत्यांचे अतुट नाते

News Desk

पाकिस्तान-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यात नेमके काय घडले ?

swarit