HW News Marathi
क्रीडा

भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह

नवी दिल्ली | क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानयांच्यातील सामन्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील लढतीमध्ये भारतआणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ११ नोव्हेंबरला एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या विश्वचषकात भारताचा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर झाला होता. या सामन्यात भारताने ३४ धावांची विजय मिळवला होता.

भारताच्या हरमनप्रीत कौरने ५१ चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर १०३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत पुन्हा एकदा मोठी खेळी साकारणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. त्याचबरोबर भारताची जेमिमा रॉड्रीग्स ही युवा खेळाडूही चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंब्रा येथील व्हॉलीबॉल स्पर्धेत लखनऊ चा संघ विजेता

swarit

फुटबॉलपटू रोनाल्डोवर बलात्काराचा आरोप

swarit

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन

Aprna