HW News Marathi
Uncategorized

पूरक पोषण आहाराची रक्कम वाढवून द्या

राज्यातील आदिवासी भागात बालमृत्यूसह कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना टी.एच.आर. हा पूरक आहार खाण्याकरिता दिला जातो. एका सव्‍‌र्हेक्षणात केवळ ५ टक्के वगळून इतर आहार फेकण्यात येतो. ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना प्रत्येक दिवशी इंधन खर्च वजा जाता ४.४२ रुपयाचा पूरक आहार दिला जातो. ही रक्कम २०११ पासून ठरली आहे. बचत गटाचे कमिशन वजा जाता बालकांना तेवढय़ा रकमेचा आहार सुद्धा मिळत नाही. तेव्हा टी.एच.आर. देण्याची पद्धत बंद करून वेगळा आहार देत ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहाराची रक्कम तिपटीने वाढवून देण्याची मागणी आंदोलकांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सनी लिओनीची कंडोमची जाहिरात वादात

News Desk

Nashik Bus Accident : 11 प्रवाश्यांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

Seema Adhe

आदित्य ठाकरेंकडून महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर!

News Desk