HW News Marathi
Uncategorized

म्हणून मुलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी

सहारणपूर(वृत्तसंस्था): स्मार्टफोनमुळे मुले अधिकच स्मार्ट बनत चालल्याने त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. हाच विचार मनात ठेवून दारुल उलूम देवबंद या संस्थेने मुलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी घातली आहे. हा नियम मोडणाºयांना शिक्षण संस्थेतून काढून टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे. देवबंदचे कुलगुरू मौलाना अबुल कासिम नोमानी यांनी या बंदीचे समर्थन केले आहे. मुलांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांना संस्कारी बनवणे ही आमची जबाबदारी आहे. त्या दृष्टीकोनातूनच आम्ही हे पाऊल उचलले आहे. सिनेमा, क्रिकेट व इंटरनेटवर अनावश्यक साइट पाहणाºया मुलांना आम्ही शिक्षण देऊ शकत नाही. कॅमेरा व विविध फिचरवाले फोन वापरणे हा देवबंदमध्ये गुन्हा असेल,’ असे त्यांनी सांगितलं. ‘मुले साधा फोन स्वत:जवळ बाळगू शकतात. मात्र, त्याचा वापर फावल्या वेळेतच करता येईल,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांनीही देवबंदच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. दारुल उलूम देवबंद ही संस्था उत्तर प्रदेशात आहे. या संस्थेत देश-विदेशातून हजारो मुलं इस्लामचं शिक्षण घेण्यासाठी येतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्ध्या महाराष्ट्रात पावसाची दडी, खरिप वाया जाण्याची भीती

News Desk

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याचे निर्देश

News Desk

जात पाहून खत देणार? सांगलीतल्या प्रकारावर जयंत पाटील, अजित पवार भडकले

News Desk