HW News Marathi
Uncategorized

राम मंदीराच्या बांधकामाला २०१८ मध्ये सुरूवात

आयोध्या – राम मंदीराचे बांधकाम २०१८ मध्ये प्रत्यक्षात सुरू होईल असा दावा वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केला आहे. सध्या राम मंदीर बाबरी मशीद विवाद सर्वोच्च न्यायालयात आहे. मात्र हा वाद न्यायालया बाहेर सोडवण्याचेही प्रयत्न सध्या सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांची भेट घेतली. या विवादीत मुद्द्यावर या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. आयोध्येत रामजन्मभूमीवरच राम मंदिर उभारण्यात यावे, असे रिझवी यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. राम मंदरी बाबरी मस्जीद वाद संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने चर्चा झाली असून २०१८ मध्ये अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल, असा दावा त्यांनी केला. काही मौलवींचा विरोध सोडला तर जवळपास सर्वच लोक या जमिनीवर मंदिर बांधण्यात यावं, या मताशी सहमत आहेत. कोणालाही हिंसा नको. दंगलीविषयी बोलणाऱ्या मौलवींची आम्हाला चिंता नाही. त्यांची पात्रताही नाही असेही ते म्हणाले. देशभरातील मुस्लिमांना हिंसा नको. हा मुद्दा चर्चेनेच सोडवला पाहिजे, असेही रिझवी म्हणाले.

श्री श्री रविशंकर यांच्यामुळे हा प्रश्न नक्कीच सुटेल, अशी विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दोन्ही समाजातील लोकांना मान्य होतील, असे मुद्दे या चर्चेच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत. त्यानंतर हा वाद नक्कीच संपुष्टात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपल्याविरोधात बोलला म्हणजे तो आपला शत्रू’ अशी BJP लॉन्ड्री पक्षाची संस्कृती – Supriya Sule

News Desk

कॉंग्रेसच्या तब्बल १२० नेत्यांचे राजीनामे…

News Desk

मुंबई, माझा तुझ्यावर भरोसा हाय, मलिष्काचा महापालिकेला पुन्हा फटका

News Desk