HW News Marathi
Uncategorized

आजी-माजी मुख्यमंत्री कोल्हापूरातील शाहुपुरीत आमने-सामने

कोल्हापूर | राज्यात आलेल्या पुरामुळे अनेक गावं उद्ध्वस्त झाली. कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगलीला पुराचा मोठा फटका बसला. याच पार्श्वभूमिवर आज (३० जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर आङेत. अर्थात ते वेगवेगळेच गेले होते मात्र कोल्हापूरातील शाहुपुरीत सहाव्या गल्लीत आजी-माजी मुख्यमंत्री समोर आले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात संवादही झाला. दरम्यान, दोघांनीही असं आमने-सामने येण, एकाच दिवशी एकाच जिल्ह्याचा दौरा करण म्हणजे राजकीय वर्तृळात चर्चा तर होणारचं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त भागातील तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातल्या चिखली गावात देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला आहे. २०१९ साली जशी मदत झाली तशी मदत यावेळी झाली पाहिजे अशी मागणी लोकांकडून करण्यात येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही आज (३० जुलै) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर चर्चा तर सुरुच आहेच.

“२०१९ मध्ये आलेल्या महापूरानं प्रचंड नुकसान झालं होतं. मी आणि चंद्रकांत दादांनी तातडीने निर्णय घेत ५ हजार रोखीने १० हजार बॅंक खात्यामध्ये छोट्या दुकानदारांना ५० हजार रुपये, जनावरांच नुकसान असेल तर त्याला २० हजार रुपये तसेच घरांच्या पडझडीसाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी दिला. शेतकरी असेल शेतमजूर असेल किंवा छोटा व्यावसायिक असेल या सर्वांना आपण विनाविलंब मदत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे प्रत्येक भागातून २०१९ साली जशी मदत झाली तशी मदत यावेळी झाली पाहिजे अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ मदत जाहीर केली पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“…असंच राहीलं तर आम्ही दरवर्षी तुम्हाला भेटत राहणार,” मु्ख्यमंत्र्याचं कोल्हापुरातील गावकऱ्यांना आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (३० जुलै) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी पुराचा फटका बसलेल्या शिरोळ येथील नृसिंहवाडी गावाला भेट दिली. दरम्यान शिरोळमध्ये निवारा केंद्रात राहत असलेल्या गावकऱ्यांची भेट घेत उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधला. दरम्यान मुख्यमंत्री आल्याने गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे पोलिसांनी गर्दी आवरणं कठीण झालं होतं. गावकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी सर्वांनी एकत्र येऊन पुनर्वसनासाठी विनंती करा असं आवाहन केलं आहे.

निवारा केंद्रातील महिलांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी संपूर्ण गावाने एकत्र येऊन पुनर्वसनाची मागणी करा, आम्ही ती मागणी मंजूर करु असं आश्वासन दिलं आहे. अन्यथा दरवेळी पाऊस येणार आणि आम्ही तुम्हाला भेटत राहणार असंच सुरु राहील. तुम्हाला पूर आल्यावर दरवेळी निवारा केंद्रात यावं लागेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना अद्यापही कोरोनाचं संकट आहे अशी आठवण करुन देताना मास्क लावायला विसरु नका असं आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंचे वंशज आहेत, ढाण्या वाघ आहे तो महाराष्ट्राचा. आम्ही आवाज दिल्यावर ते थांबले, त्यांनी आमचं ऐकून घेतलं. मुख्यमंत्री आमच्या मागण्या पूर्ण करतील, असा विश्वास आहे, असं इथल्या नागरिकाने सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी करुन योग्य मदत द्यावी, जाहीर केलेली तुटपुंजी दहा हजारांची मदत ही स्वच्छता आणि जेवणखाण्याला पुरेल ही मदत वाढवावी अशी मागणी पूरग्रस्तांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana | दावा केलेले लाभार्थी एच डब्ल्यूवर

Atul Chavan

ट्रम्प यांनी रोखलेल्या WHO च्या निधीवर बिल गेट्स यांनी दिले उत्तर

News Desk

मुंबईच्या सुरक्षिततेसाठी कठोर भूमिका घेतल्याबद्दल काँग्रेस पक्षाकडून नौदलाचे अभिनंदन

swarit