HW News Marathi
Uncategorized

“मी कधीही फोन उचलून उद्धव ठाकरेंशी बोलू शकतो”, फडणवीसांनी सांगितलं उद्धव ठाकरेंसोबतचं नातंं!

मुंबई | सत्ताधारी पक्ष असला म्हणजे त्याला विरोधी पक्ष असणारचं. हे राजकीय समीकरणच आहे. अशात आत्ताच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांमध्ये राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर मात्र त्यांच्यातील संबंध चांगले असल्याची प्रचिती अनेक वेळा अनुभवायला मिळते. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील नातं कसं आहे असा सवाल फडणवीसांना विचारला होता. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, मी कधीही त्यांना फोन करुन त्यांच्याशी बोलू शकतो”. त्यामुळे फडणवीसांच्या या उत्तरावरुन त्यांचं वैयक्तिक नातं हे चांगलं असल्याचं दिसून येतं.

मी कधीही फोन उचलून त्यांच्याशी बोलू शकतो

मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का अशी विचारणा त्यांना कऱण्यात आली. त्यावेळी फडणवीस म्हणाले, हो, मी उद्धवजींना फोन करुन शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले, एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही राजकीय विरोधक आहोत आणि ते आत्ता आहोत. गेली २५ वर्षे आम्ही एकमेकांचे मित्र राहिलो आहोत. आता त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. त्यामुळे आम्ही एकमेकांसमोर आहोत. वैयक्तिकरित्या अशी परिस्थिती नाही की, मला त्यांना शुभेच्छा देता येत नाहीत. मी कधीही फोन उचलून त्यांच्याशी बोलू शकतो.

“…अनेकदा अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली”, फडणवीसांचा चिमटा

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी पहाटे घेतलेला शपथविधी आजही राजकीय इतिहासात कायम आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस होऊन गेला. राजकारणातल्या या विरोधकांचा वाढदिवस योगायोगाने एकाच दिवशी येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही वाढदिवस नुकताच होऊन गेला. यावरुनच फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला की, जुलैमध्ये वाढदिवस असणारे मुख्यमंत्री होतात का? त्यावेळी त्यांनी मिश्किलपणे अजित पवारांना चिमटा काढला आहे.

…पण त्यांची संधी बऱ्याचदा हुकलीये

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, तुम्ही याविषयी अजित पवारांना विचारलंत तर त्यांना जास्त आनंद होईल. कारण त्यांचाही जुलैचा वाढदिवस आहे. पण त्यांची संधी बऱ्याचदा हुकलीये पण आता त्याबद्दल काय सांगायचं? अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे का असं विचारलं असता राज्यासमोर अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदापेक्षाही महत्त्वाचे प्रश्न सध्या आहेत, असं म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं होतं.

अजित पवारांचं काही ना काही कर्तृत्व तर नक्कीच आहे

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो. त्या दिवशी दोघांनीही एकमेकांविषयी वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिला होता. या लेखाच्या संदर्भानेच फडणवीस यांना विचारण्यात आलं की, मग तुमचं आणि अजित पवार यांचं नातं कसं आहे?, या प्रश्नावर फडणवीस असं म्हणाले की, प्रश्न नात्याचा नाही. एका वृत्तपत्राने आम्हाला दोघांना एकमेकांविषयीचा लेख मागितला होता. आता एवढी वर्षे अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांचं काही ना काही कर्तृत्व तर नक्कीच आहे.

वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं आहे. त्यांची कामाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे त्यांच्या काही गोष्टींबद्दल आमचं दुमत असेल, काही गोष्टींबद्दल विरोध असेल. पण त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान मान्य करणं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. आणि म्हणून मी लेख लिहिला. त्यांनीही माझ्या कार्याविषयी त्यांना जे वाटतं त्याबद्दल लेख लिहिला आहे. त्यापलीकडे याकडे पाहण्याची गरज नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोनियांची प्रकृती खालावली

News Desk

सिलिंडर आता रेशन दुकानांवर!

swarit

कोल्हापूरत अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या

News Desk