मुंबई | “स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले. ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे,” असे ट्वीट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, असे निर्देश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयात ओबीसी आरक्षणाची सुनावणी आज (20 जुलै) पार पडली.
राज ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले. ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे,” राज्यातील महागनर पालिका, नगरपरिषद आणि नगरपंचयात निवडणुकाचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर झाली. दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे बांठिया आयोगाच्या अहवालानुसार ओबीसी आरक्षण मिळणार आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्कांपर्यंत आरक्षण मिळणार आहे, बांठिया आयोगाने तशी शिफारस केली आहे. बांठिया आयोगानुसार, ज्या ज्या ठिकाणी ओबीसीची संख्या जास्त आहे. त्या त्या ठिकाणी ओबीसींना आरक्षण मिळणार आहे.
संबंधित बातम्या
OBC आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा! दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा – सर्वोच्च न्यायालय