HW News Marathi
Uncategorized

‘राजू शेट्टींनी राष्ट्रवादी विरोधात शड्डू ठोकलाय?’

मुंबई | विधान परिषदेवरील राज्यलापालांच्या १२ आमदारांच्या यादीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा सुरु आहे. त्याबाबत राजू शेट्टी यांनीही आक्रमक भूमिका मांडत राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिलाय. शेट्टी नाराज असल्याबाबत पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारला, तेव्हा पवारांनी त्या यादीत शेट्टी यांचं नाव असल्याचं पवारांनी म्हटलंय. याबाबत राजू शेट्टी यांना सांगितलं असता राजू शेट्टी यांच्या आमदारकीचं जाऊद्या, पूरग्रस्तांना मदत होणार की नाही यावर शरद पवारांनी बोलावं असं शेट्टी म्हणालेत. त्यामुळे शेट्टींची नाराजी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले शरद पवार?

“ते नाराज असतील त्याबाबत मला काही म्हणायचं नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी यादी माननीय राज्यपालांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्यावतीनं दिलेली आहे. त्यात राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावं, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. एकदा आम्ही निर्णय घेतल्यानंतर याबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटतं की अशाप्रकारची विधान कशी केली जातात. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केलं आहे. राजू शेट्टींनी काय वक्तव्य केलं मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. मी दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतोय’, असं शरद पवार म्हणाले आहेत.

राजू शेट्टींचा राष्ट्रवादीवर घणाघात

दरम्यान, आज राजू शेट्टी यांनी मीडियाशी संवाद साधताना राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला चढवला आहे. आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. तो साधा समझोता आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात हा समझोता झाला होता. तो पाळायचा की नाही पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचा आणि कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचं आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो, असं शेट्टी म्हणाले आहेत.

तर करेक्ट कार्यक्रम करेन

मला त्या यादीतून का वगळण्यात आलं हे राष्ट्रवादीचे नेते सांगू शकतील. डावललं की नाही हे मलाही माहीत नाही, असं सांगतानाच ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन, असा इशाराही त्यांनी दिला. मी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे म्हणून मला डावलले गेले आहे. मी हाडाचा कार्यकर्ता आहे. मला आमदारकी काही मिळो न मिळो माझे आंदोलन सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राज्यपाल कोश्यारी यांनी देशाची माफी मागावी’, नाना पटोलेंची मागणी….!

News Desk

मुंबई, माझा तुझ्यावर भरोसा हाय, मलिष्काचा महापालिकेला पुन्हा फटका

News Desk

जीएसटीबाबत सर्वत्र संभ्रमाचे वातावरण

News Desk