HW News Marathi
Uncategorized

काँग्रेस कार्यकारिणीने एकमताने फेटाळला राहुल गांधींचा राजीनाम्याचा प्रस्ताव

नवी दिल्ली | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत देशात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर काँग्रेसचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज (२५ मे) काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. तब्बल ३ तास चाललेल्या या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत या कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी एकमताने राहुल गांधी यांचा राजीनाम्याचा हा प्रस्ताव फेटाळून लावला असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.

“राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाची आणि नेतृत्वाची पक्षाला गरज आहे”, असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या या बैठकीनंतर रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. “यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी यांनी आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, काँग्रेसच्या कार्यकारिणीने राहुल गांधी यांचा हा राजीनाम्याचा प्रस्ताव एकमताने फेटाळून लावला आहे. त्याचप्रमाणे, पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी पक्षात आवश्यक ते सर्व अंतर्गत बदल करण्याचे संपूर्ण अधिकार राहुल गांधी यांना देण्यात आल्याची देखील माहिती सुरजेवाला यांनी यावेळी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर, एकापेक्षा जास्त जणांना मेसेज पाठवण्यावर निर्बंध

News Desk

स्वाइन फ्ल्युने घेतले १०४९ बळी!

News Desk

पूनम राऊतने दिला ‘सुद्धृढ पाय, सुद्धृढ भारत’चा नारा

News Desk