Site icon HW News Marathi

संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत सुनावली ED कोठडी

मुंबई |  पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Case) शिवसेना खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांच्या ई़डी कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.  पीएमएलए न्यायालयने राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यामुळे राऊतांच्या ईडीच्या कोठडीत मुक्काम वाढला आहे. यानंतर ईडीने न्यायालयात राऊतांना हजर केल्यानंतर त्यांना 4 ऑगस्टपर्यंतची कोठडी सुनावली होती. राऊतांची आज (4 ऑगस्ट) ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान,  ईडीने राऊतांना 31 जुलै रोजी मध्य रात्री अटक केली होती.

 

या प्रकरणात ईडीने राऊतांच्या कुटुंबाला एक कोटी सहा लाख रुपये मिळाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळवण्यासाठी ईडीने मंगळवारी (2 ऑगस्ट) दोन ठिकाणी ठापे टाकले होते. तर काही लोकांना ईडीने समन्स बजावला आहे. न्यायालयात सुनावणी दरम्यान राऊत म्हणाले, मला ज्या ठिकाणी ठेवले आहे, तिथे हवा खेळती नाही. कारण, मला हृदयविकाराचा त्रास असल्याने श्वास घेण्यास त्रास होत आहे. यासंदर्भात ईडीमधील अधिकाऱ्यांना दिल्याची त्यांनी सांगितले आहे.

 

नेमके काय आहे प्रकरण

 

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

 

Exit mobile version