HW News Marathi
महाराष्ट्र

उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार

मुंबई । टाटा उद्योग समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे अपघाती निधन झाले आहे. मिस्त्रींचे काल (४ सप्टेंबर) पालघर येथे अपघात झाला. या अपघातात मिस्त्रींचे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर उद्या (६ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मिस्त्रींच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.  सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कार ही अहमदाबादहून मुंबईच्या दिशने येत असताना त्याचा अपघात झाला. सायरस मिस्त्री यांची कार डिव्हायडरला आदळून हा अपघत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मिस्त्रींच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर मिस्त्रींच्या पार्थिवावर पोस्टमार्टम करण्यात आले. मिस्त्रींच्या पोस्टमार्टम काल रात्री अडीच वाजताच्या सुमारास आली. या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, मिस्त्रींच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाली आहे. वैद्यकीय भाषेत त्याला ‘पॉलीट्रॉमा’ म्हणतात. यामुळे मिस्त्रींचा कार अपघाता जागीच मृत्यू झाला. मिस्त्रींचे भाऊ आणि मुले आज रात्री मुंबईत आल्यानंतर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

मिस्त्रींच्या कारला पालघरमधील चारोटी येथे अपघात झाला. या अपघातात मिस्त्रींचा जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कार ही अहमदाबादहून मुंबईच्या दिशने येत असताना त्याचा अपघात झाला. सायरस मिस्त्री यांची कार डिव्हायडरला आदळून हा अपघत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघाता मिस्त्री वयाच्या 54 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, “आज दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास अहमदाबादहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर सायरस मिस्त्रीच्या कारला अपघात झाला. या कारने डिव्हायडरला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. यात सायरस मिस्त्री आणि ड्राइवर यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहे.”

 

सायरस मिस्त्री यांचा अल्पपरिचय

उद्योगपती पल्लोनजी मिस्त्री यांचे सायरस मिस्त्री हे धाकटे सुपूत्र होते. सायरस मिस्त्री यांचा जन्म मुंबईतील पारसी कुंटुंबात झाला. सायरस मिस्त्री यांचे लंडन बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. सायरस मिस्त्री यांनी लंडनच्या इंपीरियल कॉलेज यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. सायरस मिस्त्रींनी शापूरजी पल्लोनजी समूहाचे मॅनेजिग डायरेक्टर पद सुद्धा त्यांनी भूषवले होते.  २००६ साली ते टाटा समुहाचे सदस्य बनले असून २०१३ मध्ये वयाच्या ४३ व्या वर्षीच सायरस मिस्त्री टाटा समुहाचे अध्यक्ष बनले होते. परंतु, २०१६ मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटा समुहाच्या प्रमुख पदावरून हक्कालपट्टी केली होती. यानंतर सायरस मिस्त्री आणि टाटा समूह यांच्यातील वाद न्यायालयात पोहोचला होता. तसेच २६/११ हल्ल्यात जखमी आणि यांच्यासह मृतांना टाटा समूहाकडून मदत देण्यात सायरस मिस्त्री यांचा मोठा वाटा होता.

संबंधित बातम्या

टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…ST कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात कशी झाली वाढ?

News Desk

गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि मुंबई पोलीस आयुक्तांची महत्त्वपूर्ण बैठक

News Desk

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

News Desk