HW News Marathi
Uncategorized

एल व एन विभागातील नागरीकांनी पाणी उकळून प्यावे- पालिका

मुंबई : येत्या सात दिवसात एल आणि एन वॉर्ड मधील लोकांनी पाणी उकळून पिण्याचे पालिकेने आवाहन केले आहे. मुंबईत गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने ही सूचना जारी केली आहे. घाटकोपर जलाशयाच्या टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर जलाशय ७ मे पासून सुरु होणार आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा मुंबईकरांना होणार आहे.

विशेषतः बीएमसीच्या एल आणि एन या विभागांमध्ये जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच प्रामुख्याने कुर्ला आणि घाटकोपर भागातील नागरिकांनी येत्या ७ तारखेपासून पुढचा आठवडाभर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

५ हजार गरीबांना अन्न धान्य वितरित करुन घडवला आदर्श…

swarit

अयोध्या प्रकरणातील १८ पुर्नविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

News Desk

“Uddhav Thackeray यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे” – Devendra Fadnavis

News Desk