HW News Marathi
Uncategorized

लखीमपूर खेरी प्रकरणी प्रश्न विचारताच केंद्रीय मंत्री संतापले; पत्रकाराची पकडली कॉलर

मुंबई | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याच्या आरोप असलेले केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी हे पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात अडकले आहेत. मिश्रा यांनी एबीपी नेटवर्कच्या पत्रकाराची कॉलर पकडून धमकावले असून इतके करून मिश्रा थांबले नाही तर त्यांनी पत्रकाराचा मोबाईल खेचून कॅमेरे बंद केले.

मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा लखीमपूर खेरी घटनेचा मुख्य आरोप असून अटक करण्यात आली. तो सध्या जेलमध्ये आहे. या प्रकरणाचा अहवालात नवीन चौकशी करण्याची शिफारस करण्यासंदर्भात पत्रकारांनी विचारल्यावर मिश्रा संतापले. यावेळी मिश्रा यांनी प्रश्न विचरणाऱ्या पत्रकार अरेरावी करत ते म्हणाले, “हे असले मूर्ख प्रश्न विचारु नका. तुमचं डोकं फिरलं आहे का?,” असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांचे शांततापूर्ण आंदोलन सुरू होते. तेव्हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मागून येऊन त्यांच्या गाडीखाली चिरडल्याचा आरोप आहे. या घटनेत ४ शेतकरी आणि एक पत्रकारांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मिश्रा आणि त्यांच्या मुलाविरोधात संताप व्यक्त केला गेला होता. यानंतर आशिष मिश्रासह १४ अटक करण्यात आली असून सध्या ते जेलमध्ये आहेत. यामुळे मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून वारंवार झाली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मतदाना दिवशी जनताच भाजपला शॉक देणार, मोदीजी काळ्या पैशाचं काय झालं ?

News Desk

पंतप्रधानांनी अर्धवट माहितीवर बोलू नये…

News Desk

लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडण, पुढं जाऊन संसार कसा होणार ?

News Desk