HW News Marathi
राजकारण

एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या सुट्ट्या रद्द

मुंबई | एसटी महामंडळाने दिवाळीतील प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. महामंडळाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आज, २९ ऑक्टोबरपासून दिवाळी हंगाम संपेपर्यंत सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. दिवाळी हंगामात एसटीतील प्रवाशांची संख्या वाढते. नेमक्या याच कालावधीत तात्पुरती भाडेवाढ करून महसूलवाढीचा प्रयत्न केला जातो. मात्र गेल्या वर्षी दिवाळीच्या काळातच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.

दिवाळीकाळात आंदोलन झाल्यास राज्यभरातील प्रवासी त्यात भरडून निघतात. यंदा एसटी महामंडळाने कर्मचारी संघटनांच्या उपोषण, आंदोलनाच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेतली आहे. त्या अनुषंगाने महामंडळाने दिवाळी हंगाम संपेपर्यंत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील परिपत्रकात सुट्टीवर गेलेले कर्मचारी, अधिकाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्याबाबतही स्पष्ट सूचना दिल्या आहेत. एसटीने राज्यातील विभागीय कार्यालये, आगारांमध्ये परिपत्रक रवाना केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मनेका गांधी आणि आझम खान यांच्यावर देखील प्रचार बंदी

News Desk

नितेश राणेंनी महापालिकेवरील मोर्चा पुढे ढकलला

swarit

पंतप्रधान मोदींच्या मंचावर विजयसिंह मोहिते पाटील, पवारांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा

News Desk
राजकारण

पुतण्या आला धावून

Gauri Tilekar

बारामती | ‘उद्धव ठाकरे कधी लोकांच्यातून निवडून आले नाहीत की मातोश्रीच्या बाहेर पडून उभा महाराष्ट्र पाहण्याचे देखील साधं कष्ट घेतले नाहीत. महाराष्ट्र जळत असताना हे महाशय सत्तेत भागीदार होऊन सर्वसामान्यांना भुलवण्याचं काम करत आहेत. लेख लिहिण्याऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता’, अशी खोचक टीका अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवारने फेसबुकवरून केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवारने काकांच्या बचावासाठी जोरदार बॅटिंग केली आहे. राजकारणात काका पुतण्याची नवी जोडी उदयाला येत असल्याची चिन्हे दिसत आहेत.

अजित पवारांवर केलेली टीका

अजित पवार हा पुण्याच्या राजकारणातील एक गटारी किडा आहे. गटारातील घाण पाण्यावर तो श्वास घेतो. भ्रष्टाचाराच्याच प्राणवायूवर जगतो. हे गटारही त्याचे स्वतःचे नसून त्याच्या पक्षानेच निर्माण केले आहे. त्यामुळे या गटारी किडय़ास महाराष्ट्रातील जनता कोणतीही किंमत देण्यास तयार नाही. तरीही हा गटारी किडा अधूनमधून वळवळत आणि बडबडत असतो. हे महाशय मंत्रालयात विराजमान असताना सुकलेल्या जिभा आणि कोरडे घसे घेऊन सोलापूरचे धरणग्रस्त पाणी मागायला मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास बसले होते.

राहुल पवारची उद्धव ठाकरेंवर टीका

बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, आमच्या उद्धवला सांभाळा !

त्या सांभाळाचा अर्थ काल समजला, त्याचा अर्थ आमचा मुलगा अल्लड आहे त्याला सांभाळून घ्या असाच असावा. बाळासाहेब हुशार होते, भाषेवर प्रभुत्व असणारे मोठ्ठे नेते होते. मार्मिक असो कि सामना त्यांनी टिका देखील जहाल केली, पण त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गरळ ओकून त्यांच्याच लेखणीचा अपमान केला.द्धव ठाकरे कधी लोकांच्यातून निवडून आले नाहीत की मातोश्रीच्या बाहेर पडून उभा महाराष्ट्र पाहण्याचं देखील साधं कष्ट घेतलं नाही. महाराष्ट्र जळत असताना हे महाशय सत्तेत भागीदार होवून सर्वसामान्यांना भुलवण्याचं काम करत आहेत. इतका लेख लिहण्याच्या ऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता.

Related posts

#Article370Abolished : ऑक्टोबरमध्ये ५ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी

News Desk

किरीट सोमय्या ‘नॉट रिचेबल’

News Desk

कोण आहेत राष्ट्रवादीचे ३१ प्रवक्ते ?  

News Desk