HW News Marathi
राजकारण

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही तर…! अनिल परबांची माहिती

मुंबई | मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही, तर औरंगाबादच्या नामांतर करून संभाजीनगर करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांना दिली आहे. राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाच्या बैठकी बोलवण्यात आली. मंत्रिमंडळाची आज (28 जून) झालेल्या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही नसून पोलीस भरती आणि औरंगाबादचे नामांतर आदी विषयांवर चर्चा झाल्याचे अनिल परब यांनी माध्यमांना माहिती दिली.

“गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना औरंगाबादेच नामांतर करून संभाजीनगर करावे, अशी मागणी करत होते. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराचा विषय आणावा आणि मंजूर करावा, अशी विनंत मुख्यमंत्र्यांना केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय विषयावर चर्चा होत नाही. यात राजकीय धोरणे यासंदर्भातील निर्णय होत असतात,” अशी माहिती अनिल परब यांनी माध्यमांना दिली आहे.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची उद्या (29 जून) बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कदाचित उद्या होण्याऱ्या बैठकीत राज्याच्या राजकीय संघर्ष परिस्थितीवर चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटात 5 मंत्री आणि 4 राज्यमंत्री बंडखोरी गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल (27 जून) मंत्रिमंडळात फेरफार केला आहे.

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल

  • शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती (कंसात) संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (रा.उ.शु.),
  • राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)
  • अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)
  • ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती(कंसात) आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)
संबंधित बातम्या
ठाकरे सरकारने बंडखोरी केलेल्या 5 मंत्री आणि 4 राज्यमंत्र्यांच्या खात्यात केला फेरबदल
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत यांच्या निवासस्थानी ED चे पथक दाखल; ‘या’ प्रकरणी अटक होणार?

Aprna

तरीही मृदंगाचा गजर सुरूच आहे !

News Desk

पोलादपूर बस दुर्घटनेवरुन भाजप सरकारवर उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

News Desk