HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारची लायकी फक्त पोस्टर्स लावण्यापुरती; राज्यात भाजपची सत्ता आणणार! – नारायण राणे

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने सत्ता काबीज केली आहे. या विजयानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ज्यांना अक्कल आहे, त्यांच्याच ताब्यात लोकांनी जिल्हा बँक दिली, असा प्रहार राणेंनी केला आहे. निवडणुकीतील विजयानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सिंधुदुर्गच्या निवडणुकीनंतर आता राज्यात भाजपची सत्ता आणणार असल्याचं म्हणत नारायण राणेंनी राज्य सरकारलाही टोला लगावला आहे. राणे म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीनही पक्ष माझ्या विरोधात एकत्र आले. तरीही मी त्यांनी पुरुन उरलोय. राज्य सरकारची लायकी ही फक्त पोस्टर्स लावण्यापुरती आहे. आम्हाला मुख्यमंत्री भाजपचा हवे आहे, लगानची टीम नको आहे”, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर ११ जागा जिंकत भाजपने सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला केवळ आठ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या निवडणुकीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली होती. त्यानंतर चिट्ठी टाकून आलेल्या निकालात सतीश सावंत पराभूत झाले आहेत. त्याचबरोबर बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. तर भाजपची सत्ता जरी आली असली तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा देखील पराभव झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल- मनसेचा इशारा

News Desk

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप आमदार आक्रमक!

News Desk

वर्षपूर्तीच्या आनंद संपायच्या आत काँग्रेसचे इशारे सुरू, भाजपचा टोला

News Desk