HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप आमदाराच्या 500 कोटी प्रकरणाची चौकशी का नाही? भावना गवळींचा थेट सवाल!

वाशिम। परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस मिळत नाही तेच शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या दोन कंपन्यावर छापे मारले आहे. ‘शिवसेनेला भाजप टार्गेट करीत असून, ईडीची नोटीस न येताच ईडीची चौकशी केल्या जात असल्याची प्रतिक्रिया भावना गवळींनी दिली.

माझी चौकशी ईडी करत असेल तर त्यांची सुद्धा चौकशी का केली जात नाही

तसंच, ‘केंद्र सरकार हे जुलमी आहे. त्यांच्याकडून एका प्रकारे आणीबाणी सुरू आहे. कारंजाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशिममध्ये 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे पुरावे दिले. मात्र त्यावर अद्याप चौकशी लागली नाही. त्यांची पण चौकशी झाली पाहिजे’, असा आरोपही गवळी यांनी केला.’जर माझी चौकशी करायची असेल तर खुशाल करा, पण भाजप आमदाराने जमीन घोटाळा करून त्यांनी 500 कोटींचा गैरव्यवहार केला आहे. माझी चौकशी ईडी करत असेल तर त्यांची सुद्धा चौकशी का केली जात नाही, अनेक लोकांच्या कारखाने आहे, संस्था आहे, त्यांची चौकशी का होत नाही’, अशी मागणीही गवळी यांनी केली.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे ईडीनं या धाडी टाकल्याचं समोर

तर आज सकाळी ईडीकडून गवळी यांच्या संस्थेत कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ येथील संस्थांवर धाडी टाकल्या. ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्याचं समजतंय. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे ईडीनं या धाडी टाकल्याचं समोर येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीनं धाडी टाकल्याची माहिती समोर आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारने अर्थव्यवस्थेसंदर्भात घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ६ दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा यंत्रणांना यश

Aprna

कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करणारं शरद पवारांचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल  

News Desk