HW News Marathi
Uncategorized

प्रताप सरनाईक यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

‘मनी लॉन्ड्रिंग’ प्रकरणात चौकशी सुरू असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह चार जणांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा २३ ऑगस्टपर्यंत बुधवारी वाढविण्यात आला. चौघांविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देश न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला दिले.नॅशनल स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने चौकशी सुरू केली आहे. या विरोधात सरनाईक, त्यांचे पुत्र विहंग आणि पूर्वेश, तसेच योगेश चांदेगा यांनी न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर तातडीने सुनावणी होऊ शकणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. मात्र, पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने ‘ईडी’ला दिले.

सरनाईक यांनी या आरोपांचे खंडन केले

याआधी टॉप्स सुरक्षारक्षक प्रकरणात सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ‘ईडी’ ने एनएसईएल प्रकरणात योगेश देशमुख याला अटक केली आहे. देशमुख सरनाईक यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. सुमारे ५,५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात काही व्यवहार देशमुख यांच्याकडून झाल्याचा दावा ‘ईडी’कडून केला जात आहे. सरनाईक यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जीएसटीबाबत सर्वत्र संभ्रमाचे वातावरण

News Desk

म्हणून मुलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी

News Desk

राज्यात कोरोनाबाधित ७२२ जणांना डिस्जार्ज, एकूण रुग्ण संख्या ५२१८

News Desk