HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडी सरकारला दोन वर्षे झाली हे अनेकांना डायजेस्ट होत नाही! – भुजबळ

मुंबई । अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या ‘द्विवर्षपूर्ती’वरून विरोधकांना टोला लगावला आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, “महाविकासआघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र काही लोकांना अद्यापही हे ‘डायजेस्ट’ होत नाही. सोनिया गांधी, शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत आहे. हे सरकार आपली पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुन्हा एकदा सत्तेत येईल”, असा विश्वास देखील यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

भुजबळ पुढे म्हणाले की, “फुले, शाहू, आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला आरक्षण मिळाले. ज्यांनी आपले आयुष्य आपल्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी व्यथित केले त्यांना आपण विसरता कामा नये. सगळीकडे महात्मा फुले व सावित्रीबाई यांचे पुतळे उभारण्यात यावे छत्रपती शाहू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचे कार्यक्रम घ्यावेत असे आवाहनही त्यांनी केले. त्याचसोबत, गल्ली गल्लीतून फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाचा नारा दिला जावा असेही ते म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महिलांच्या बाबतीत हे सरकार पूर्णपणे असंवेदनशील”, ठाकरे सरकारवर महिला आयोगाकडून टीका

News Desk

अनिल परब, संजय राऊत यांचीही चौकशी करा, चंद्रकांत पाटलांची मागणी

News Desk

अनिल परबांच्या निमंत्रणानंतर ST संदर्भात पडळकर, खोतांची सरकारसोबत चर्चा सुरू

News Desk